के एल राहुल ने साकारला भारताचा विजय.....K L Rahul ne sakarla Bhartacha vijay

 

के एल राहुल ने साकारला भारताचा विजय
 

मुंबई : गेल्या काही सामन्यात सातत्याने अपयश ठरल्यानंतर टीका करांचा टारगेट ठरलेल्या लोकेश राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एक दिवशी सामन्यात खंबीर फलंदाजी करत भारताला पाच गड्यांनी विजय मिळवून दिला.

       राहुलने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांतपणे खेळताना 91 चेंडू सात चौकार व एक षटकार सह नाबाद 75 धावांची विजयी खेळी केली राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी केलेले शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरले.

       नाणेफेक जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात 188 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने 39.5 षटकांमध्ये पाच फलंदाजाच्या मोबदल्यात विजय मिळवला लक्षाचा पाठलाग करताना भारताचे पहिले चार प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. यामुळे यजमानांचे चार बाद 39 अशी अवस्था झाली होती. मात्र राहुलने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला मालिकेत एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली कर्णधार हार्दिक पांड्या 25 आणि रवींद्र जडेजा 45 यांनी दमदार फलंदाजी केली या सहभारताने वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एक दिवसीय सामन्यातून केवळ दुसरा विजय मिळवण्याची कामगिरीही केली.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद